गौरवात्मक उपक्रम

ग्रामपंचायतीची सर्व राजकीय पक्षांनी सामंजस्याने बिनविरोध निवडणूक करुन गावाने नवा आदर्श घडविला. गावातील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक शाततेत पार पाडण्यासाठी साळुंब्रेसह परिसरातील अन्य गावातील विविध पक्षांचे राजकीय नेते, निवडणुकीचे उमेदवार व मतदार बंधू – भगिनींनी सहकार्य करुन एक वेगळा आदर्श निर्माण केला. पतपेढयांच्या निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत, ग्राम पंचायत निवडणूक बिनविरोध करुन गावातील शातता, सुव्यवस्था, भाउबंदकी, परस्परांविषयी तेढं, राजकीय वैमनस्य व गावात यामुळे वाढणरा कायमचा तणाव दूर होण्यासाठी याचा खूपच उपयोग झाला व अन्य गावांच्यासाठी एक वेगळा आदर्श निर्माण होवून शेजारी असणा-या शिरगाव या ग्राम पंचायतीचे निवडणूक बिनविरोध झाली.